Tuesday, August 14, 2012

जीवन


     
क्षणभंगूर हे जीवन तुझे
तरी धडपडे जीवा पलीकडे.
आले कितीही हाती तरी
प्रत्येक वेळी हात पसरवी.
सर्व सुखांना विसरून
दुःखाचीच करतोस गणती.
आल्या संधीला तू दूर सारतोस
मूकतोस तू भाग्याला.
भूक भागली तरी
लागतोस  टूकणी तू  
ताटातल्या भाकरीवरी.
तहान शमण्या जवळ
विहीर असूनही
घोटभर पाण्यासाठी 
प्राण पणाला लावी.
असा कसा रे वेड्या माणसा
कधी न तु  होशी शहाणा.
शहाणपण येई तेंव्हा
होशील देवास लाडका ...... 
               
 
  

No comments:

Post a Comment