Wednesday, September 12, 2012

नाती



       ----------
अतिव आनंदाच्या किंवा अतिदुखाःच्या क्षणी मनःस्थिती
कुठलाही चांगला अथवा वाईट निर्णय घेऊन चुकू शकते,
मन तेंव्हा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसते,अशा
वेळी शांत राहून कुठलाही निर्णय घेऊ नये.
     निसर्गाकडे बघावे व शिकावे ,कुठलीही परिस्थीती
आली तरी तटस्थ राहावं.चंद्र ,सूर्य,तारे यांच्या कडून
शिकावं,त्यांचा नित्यक्रम कधी कुठल्याही परिस्थितीत  
बदलत नाही. बदलतं ते रूप कधी यशस्वी ठरत नाही.
सागराला भरती-ओहोटी येणारच,म्हणून तिथे जगणारे
जीव-जंतू ,वाळु ,झाडं तटस्थच राहतात , तात्पुरते
वाकतात. पण गवताच्या पात्यासमोर रौद्ररुपी सागरही
हरतोच ...       

No comments:

Post a Comment